मुंबई : कोरोनाच्या साथीमुळे मुंबई हायकोर्टाचे दोन तास काम चालणार आहेत. याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत कामकाज चालणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ३९ रुग्ण झाल्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
जगभरात कोरोनाचा कहर वाढला असून त्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा, महाविद्यालयं, मॉल्स, उद्याने बंद करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळे असं आवाहन करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये कलम १४४ लागू असून नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.