दिल्ली : नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून देशात सरकार विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. यामध्ये विद्यार्थी, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष बुध्दीजीवी मंडळी, अभिनेते, कायदे तज्ञांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.
या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला. ‘तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार का?’ असा सवाल त्यांनी विचारलाय.
बॉलीवूड अभिनेते नागरिकत्व दुरुस्ती कायदा विरोधात उतरले आहेत. त्यामुळे मांडताना प्रकाश राज यांनी अलीकडेच ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सवाल केलाय. ‘माननीय पंतप्रधानजी आणि माननीय गृहमंत्रीजी तुम्हाला जनतेने दिलेल्या अधिकारांचा तुम्ही त्याच जनतेविरोधात असा निरंकुश वापर करणार आहात का? तुम्ही आम्हा सर्वांना ठार मारणार आहात का?’ असं विचारत त्यांनी आंदोलनाचा व्हिडिओही शेअर केला आहे.
Mr. PRIME MINISTER..Mr.HOME MINISTER..is this the way you will UNLEASH POWER.. on the CITIZENS… Will you KILL US ALL …..#JustAsking #IndiaAgainstCAA_NRC pic.twitter.com/0qHtniUMet
— Prakash Raj (@prakashraaj) December 22, 2019
प्रकाश राज यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एनआरसीच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. प्रिय पंतप्रधान, राष्ट्रीय नोंदणीकृत बेरोजगार, संकटातले शेतकरी, शिक्षणाशिवाय मुले, बेघर गरीब… ही आपली प्राथमिकता असू नये काय?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.