मुंबई : भाजप शिवसेनेला जनतेने बहुमत दिल आहे. मात्र, दोघांची युती जवळपास तुटली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीला विरोधात बानचं कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या भानगडीत काँग्रेसने जाऊ नये असा सल्ला काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी दुस-यांदा सल्ला.
शिवसेनेसोबत जाऊ नये असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही वाटतं आहे. काँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यास भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असा सल्ला निरुपम यांनी दुस-यांदा दिला आहे.
दुसरीकडे शिवसेना त्यांच्या आमदारांची बैठक घेत आहे. जयपूरमध्येही काँग्रेस आमदारांची बैठक संपन्न झाली. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.