Placeholder canvas
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्र्यांनी 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे' पिकाच्या नुकसानीची घेतली माहिती

मुख्यमंत्र्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे’ पिकाच्या नुकसानीची घेतली माहिती

Devendra fadnavis bjp shivsenaमुंबई : परतीच्या पावसानं शेतीचं नुकसानं केल. यामुळे शेतकरी हवालदिलं झाला आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी घेतला. शनिवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली जाणार आहे.
राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली असून, त्यामध्ये ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे. नुकसान झालेल्या भागांचं तत्काळ ड्रोन सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. स्थानिक गावकर्‍यांनी नुकसानीचे काढलेले छायाचित्र सुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन स्थितीचं अवलोकन करावं, असं सांगतानाच यासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. प्राथमिक माहितीनुसार राज्यात पुढीलप्रमाणे नुकसान झाले.
या विभांमध्ये झाले नुकसान…
कोकण ४६ तालुके, ९७ हजार हेक्टर,
नाशिक ५२ तालुके, १६ लाख हेक्टर,
पुणे ५१ तालुके, १.३६ लाख हेक्टरहून अधिक,
औरंगाबाद ७२ तालुके, २२ लाख हेक्टर,
अमरावती ५६ तालुके, १२ लाख हेक्टर,
नागपूर ४८ तालुके, ४० हजार हेक्टर

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments