मुंबई : मुंबईकरांच्या जीवनवाहीनीला साथ देणारी मेट्रो आली खरी परंतु तीचे जाळे सर्वत्र न पोहोचल्यामुळे मेट्रोमध्ये प्रवास करण्यासाठी खुप कमी संधी आहे. घाटकोपरहून वर्सोव्याला जाणाऱ्या एका मेट्रोचा दरवाजा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना स्टेशनवर उतरवण्यात आलं.
सगळ्यांनाच नोकरी,व्यवसाय,कॉजेच मध्ये जाण्याची घाई असते. परंतु याच वेळी जर काही तांत्रिक अडचणींमुळे लोकल,मेट्रो किंवा बसमध्ये काही बिघाड झाल्यास प्रवांशाची चांगली तारांबळ उडते. घाटकोपरहून वर्सोव्याला जाणाऱ्या एका मेट्रोचा दरवाजा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाला नाही. त्यामुळे प्रवाशांना वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे स्टेशनवर उतरवण्यात आलं आहे. परिणामी वेस्टर्न स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, मेट्रोची वाहतूक सुरु असली तर वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.