नवी दिल्ली: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांना #भारतरत्न जाहिर करावा अशी मागणी संसदेत केली. या दांम्पत्याने देशाच्या सामाजिक अभिसरणात मोलाचे योगदान दिले असून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांना भारतरत्न जाहीर केल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल.
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2018
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी २०१५ सालीच ही मागणी केली आहे. फुले दांम्पत्यास भारतरत्न जाहिर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजीक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल.
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2018
फुले दांम्पत्याने आपले संपुर्ण आयुष्य समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातले.दलित, शोषित,स्त्री,शेतकरी यांच्या भल्यासाठी ते शेवटपर्यंत झुंजले.आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास सलाम करण्यासाठी,त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा यासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) March 5, 2018