Wednesday, May 1, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखश्री श्री बरळले!

श्री श्री बरळले!

देशाचे तुकडे करण्यासाठी श्री श्री सारख्या काही बुवा, बाबांनी सत्ताधाऱ्यांकडून सुपारी घेतली. जर राम मंदिराचा मुद्दा वेळीच सोडवला नाही तर भारताचा सीरिया होईल असं विधान करुन देशात दंगली घडवण्याच हे कुभांड रचल जात आहे. काही तरी बरळून शांतता भंग करण्याचा प्रकार श्री श्री रवी शंकर यांनी केला. स्वत: ला समाजाचे ठेकेदार म्हणून मिरवणारे हे ढोंगी मंडळी सरकारच्या प्रवक्त्यांचे काम करत आहेत. देशात दंगली घडवून त्यांना नरसंहार करायच आहे का? माणस मारायची का? श्री श्री वर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक झाली पाहिजे. अयोध्येतील त्या जागेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रंलबित आहेत. न्यायालय जो काही निर्णय देईल तो निर्णय सर्वांनाच मान्य करावं लागेल. श्री श्री ला चोंबडेपणा करण्याची काय गरज होती? राम मंदिराचा मुद्दा सोडवला नाही तर भारताचा सीरिया झालेला आपल्याला बघायला मिळेल असे मत व्यक्त का करण्यात आलयं. सीरियामध्ये परिस्थिती भयंकर आहे. सीरियामध्ये सत्तारूढ अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारविरोधात गेली आठ वर्षे बंडखोरांनी युद्ध छेडले असून प्रचंड प्रमाणात संहार झाला आहे. या यादवीमध्ये ४,६५,००० सीरियन मारले गेले. १० लाखांपेक्षा जास्त जखमी झाले. व जवळपास सव्वा कोटी सीरियन विस्थापित झाले. शेवटी कोणत्याही देशातील माणसं असोत ती माणसं असतात. अयोध्येचा विषय न्यायप्रविष्ठ असतांना त्या बाबत बोलण हा न्यायालयाचा अपमान आहे. आज सत्ताधारी भाजपा संघाची मंडळी तसेच त्यांचे बगलबच्चे हे देशातील एकात्मतेला धक्का पोहोचेल अशी विधान करत आहेत. रवी शंकर यांच्या मागचा मास्टर माईंड हा वेगळाच आहे. रामदेव बाबा तसेच इतर बुवा,बाबा हे सरकारच्या हाताल बाहुलं बनलं आहे. बुवा बाबांना हा उन्मादपणा आलं कुठून. श्री श्री हे जर आर्टँ ऑफ लिव्हींग च सोडून सीरीया सारखी परिस्थिती भारतात होईल असं बोलत असतील तर ती गंभीर बाब आहे. आज देशातील जनते समोर रोजगार, दोन वेळचं जेवण,महागाई, हाताला काम,शेतकऱ्यांचे प्रश्न,नोकरदारांचे प्रलंबित प्रश्न,अशी अनेक काम आ वासून बसलं आहेत. याकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहेत. कुणी ना कुणी सरकारमधील किंवा बाहेरील बगलबच्चे तोंड आ वासून बसले आहेत. सैनिक शहिद होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरुच आहेत. देशातील गुन्हेगारीच प्रमाण वाढले आहे.या विषयावर सरकारचे बगल बच्चे बोलायला तयार नाही. कारण त्यांना बोलायला तोंड नाही. परंतु हिंदु, मुस्लिम दंगली कशा पेटतील याची ते वाट पहातात. धार्मिक स्थळांच्या मुद्यावरुन कुणी ना कुणी काही तरी बरळत असतं. मात्र याद राखा देशात दंगली पेटल्या तर नुकसान सर्वांचेच होईल. १२५ कोटीचा देश एक आहे अखंड आहेत. यासाठी खुर्च्या टिकवण्यासाठी माणस मरणार नाही हे लक्षात ठेवा.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments