मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरून देशभरात हिंसाचार उफाळला आहे. आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा असे प्रश्नही देशात ऐरणीवर आले असल्याचं म्हणत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. मुंडेंनी आपल्या ट्विटसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सूर्यग्रहण पाहत असतानाचा फोटो शेअर करुन टोला लगावला आहे.
आर्थिक डबघाई
बेरोजगारी
महिला सुरक्षा#CAA_NRC साठी सुरु असलेला हिंसाचार
कायदा सुव्यवस्थादिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? #solareclipse2019 pic.twitter.com/uSFPI766YT
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 26, 2019
आज देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी तयारीही केली. पण, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले. इतर भारतीयांप्रमाणेच आपणही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो, पण दुर्दैवानं बघता आले नाही, असं म्हणत मोदींनी नाराजीही व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटसोबत कोही फोटो शेअर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांचा एक फोटो ट्विट करत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल केला आहे.