मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’वरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला. शिवसेनेचा महाराष्ट्राच्या सत्तेत कायम राहणार. आम्ही येत-जात राहणार नाही. पुन्हा पुन्हा येईन, असं म्हणणार नाही.’ असा टोला राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत लगावला.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,’ असा विश्वास शिवसेना खासदार राऊत यांनी आज बोलून दाखवला.
भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य केलं. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिलं जाणार आहे. नवं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल,’ असं राऊत म्हणाले.