Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप अपयश झाकण्यासाठी दंगली घडवत आहेत : डॉ. जितेंद्र आव्हाड

भाजप अपयश झाकण्यासाठी दंगली घडवत आहेत : डॉ. जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Narendra Modi,Jitendra, Awhad, Narendra, Modi,Jitendra Awhad, Narendra Modi,Chhatrapati Shivaji Maharaj,Shivaji maharaj,Shivaji,Aaj ke Shivaji Narendra modi,Aaj ke shivaji

मुंबई : देशात बेरोजगारी वाढली. आर्थिक घसरण थांबत नाही. सरकारला कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसल्यामुळे भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे. दिल्लीत दंगली घडल्या त्याचप्रमाणे मुंबईतसुध्दा दंगली घडावी अशी भाजपची इच्छा होती. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे भाजपला ते शक्य झालं नाही असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते, गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा एक दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर आज रविवार (१ मार्च) रोजी सोमैय्या मैदान, चुनाभट्टी सायन, मुंबई येथे संपन्न होत आहे. यावेळी बोलताना गृहमंत्री डॉ. आव्हाड यांनी दिल्ली दंगलीवरून भाजपवर जोरदार हल्ला चढविला. भाजप देशाचं राजकारण धर्मव्देषाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात ठेवायचं काम करत आहे. दिल्लीमध्ये दंगल झाली. गृहमंत्री अमित शाह यांनी एकही शब्द न काढणे, म्हणजेचं क्रुरतेची परिसीमा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह ही जोडी दिल्ली पॅटर्न देशभरात चालवणार असल्याचाही आरोप डॉ. आव्हाड यांनी केला आहे.

देशात बेरोजगारी वाढली. आर्थिक घसरन थांबत नाही. सरकारला कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नसल्यामुळे भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे. गुजरातमध्ये २००२ प्रमाणे दंगल घडवण्यात आली होती. तेच मॉडेल आता दिल्लीत पाहायला मिळत असल्याचा आरोप डॉ. आव्हाड यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments