मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक सेवा बंद ठेवली जाणार अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबत मोठं विधानं केलं. जर गर्दी ओसरली नाही तर लोकल, बस बंद करण्याचा निर्णय घेऊ. सध्या बंद बाबत कोणताही निर्णय घेतला गेला नाही. असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी पुढील पंधरा दिवस महत्वाचे आहेत. महाराष्ट्रात कोरानाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. शाळा, महाविद्यालयं, स्विमींग पूल, मॉल,धार्मिकस्थळं बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहेत.