Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमुख्य बातम्यापुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार येणार : चंद्रकांत पाटील

पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार येणार : चंद्रकांत पाटील

The BJP-led government will come again Chandrakant Patil
मुंबई : राज्यात भाजपचं सरकार स्थापन होईल. भाजपाकडे १०५ जागा तर १४ अपक्षांचा पाठिंबा आहेत. भाजपाकडे ११९ जागा आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, भाजपाच्या तीन बैठका पूर्ण झाल्या. काल निवडून आलेल्या आमदारांची बैठक झाली. आज दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण आम्ही केलं. भाजपाकडे १०५ जागा तर १४ अपक्षांचा पाठिंबा आहे. भाजपाकडे ११९ जागा आहेत. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

१६४ जागांपैकी आम्ही १०५ जागा जिंकलो आहोत. राज्यात १ कोटी ४२ लाख अशी सर्वाधिक मतं भाजपाला मिळाली आहेत असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यात आम्हीच सरकार स्थापन करु. कडबोळ सरकार राज्यात टिकणार नाहीत असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments