मुंबई : पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला दोन दिवसात गुड न्यूज मिळेल अशी माहिती मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच संपला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तास्थापन करणार आहेत. मलिक म्हणाले, “सत्तासंघर्ष संपला आहे. आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालंकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.
किमान समान कार्यक्रमाचा अजेंडा आज फायनल होईल. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे का, असा प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी सांगितलं. त्या केवळ चर्चाच आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं मलिक म्हणाले.