मुंबई : लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यानंतर शिवसेनेने राज्यसभेत या विधेयकाविरोधात संदिग्ध भूमिका घेतली. राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने भूमिका बदलली आहे का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
सोमवारी शिवसेनेने लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले होते. बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. भूमिका बदलण्यासाठी शिवसेनेवर काँग्रेसने दबाव टाकला होता का? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून शिवसेनेने यूटर्न घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेने रातोरात त्यांची भूमिक बदलली आहे. याचा अर्थ शिवसेनेवर कुणाचा दबाव होता का? राज्यातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने ही भूमिका घेतली का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.