Placeholder canvas
Monday, April 29, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबाद‘या’ अटीवर औरंगाबादचं नाव संभाजी नगर करु : खा. इम्तियाज जलिल

‘या’ अटीवर औरंगाबादचं नाव संभाजी नगर करु : खा. इम्तियाज जलिल

Imtiyaz Jaleel AIMIM,Imtiyaz Jaleel, AIMIM,Imtiyaz, Jaleelऔरंगाबाद : शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीपासून औरंगाबादच्या नामांतरचा वाद सुरु आहे. आता त्यामध्ये मनसेनं उडी घेतली. संभाजी महाराज हे महापुरुष होते. संभाजी महाराज हे महापुरुष होते. मनसे आणि शिवसेनेला त्यांचं नाव द्यायचं असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ” यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत भूमिका स्पष्ट केली.

“मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष औरंगाबादचं नामांतर होईल असं म्हणत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार तर कुठल्याही क्षणी औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर करण्यात येईल असं म्हणत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांना माझा एक सल्ला आहे, आधी शहराच्या विकासासाठी काम करा. पुढच्या चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवा. संभाजी महाराज हे महापुरुष होते. त्यांचं नाव द्यायचं असेल तर आधी शहराचा विकास करा. त्यानंतर नाव बदलण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ” औरंगबादमध्ये जलील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा…

खा. इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन असंही खा. इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments