मुंबई : मनसेनं नव्या झेंड्यावर राजमुद्रेचा वापर केल्याने राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस पाठविली आहे. संभाजी बिग्रेड आणि मराठा महासंघाने तक्रार केली होती. त्यामुळे मनसेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मनसेनं महाअधिवेशनात २३ जानेवारी रोजी पक्षाचा झेंडा बदलून नवीन झेंडा आणला. त्या झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करण्यात आला आहे. राजमुद्रेचा वापर करु नका यावरून छावा संघटनांनी पुणे पोलीस ठाण्यात राज ठाकरेंच्या विरोधात तक्रार दिली होती. तसेच संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.