Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याअडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं : नितीन गडकरी

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं : नितीन गडकरी

Nitin Gadkari said Two and a half years for CM post was not decided
मुंबई : शिवसेना भाजपामध्ये अडीच- अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद ठरलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच सरकारं बनेलं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई येथे शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

भाजप शिवसेनेमध्ये सत्ता संघर्ष सुरु आहे. मध्यस्थीसाठी नितीन गडकरी आज मुंबईत दाखल झाले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना गडकरी यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावरून काही ठरलं नव्हतं, असं गडकरींनी स्पष्ट केलं. गडकरी म्हणाले, मी भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोललो होतो, त्यावेळी शाह यांनी सांगितले होते मुख्यमंत्रीपदाबाबत काही ठरलं नव्हतं. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री हा जुनाच फॉर्म्युला होता. भाजपचे आमदार जास्त असल्यामुळे आमचाच मुख्यमंत्री होईल. असेही गडकरींनी स्पष्ट केले. त्यामुळे युतीमध्ये पेच कायम राहणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.

आज सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे सांगितलं होतं की, गडकरी जर मातोश्रीवर येत असतील तर ते अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असं लेखी आणणार आहेत का? असा सवाल उपस्थितीत केला होता. त्यामुळे हा पेच सध्या तरी कायम आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments