शिवसेना-भाजपचे 50-50 फॉर्म्युल्यावरून सत्ता स्थापनेवरून घोडे अडले. समसमान वाटपावरून शिवसेना ठाम आहे. राज्यात पुन्हा निवडणुका लादल्या जाऊ नये, म्हणून शिवसेनेला वेळप्रसंगी राष्ट्रवादी पाठिंबा देऊ शकते. असे राष्ट्रवादीचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भाजप आज विधीमंडळाचा गटनेता निवडणार आहे. भाजप अपक्षांच्या भरवशावर सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याची शक्यता आहे. परंतु, भाजपला विधिमंडळात बहुमत सिध्द करावे लागेल. भाजपाकडे बहुमत नाही त्यामुळे पुन्हा राज्यावर निवडणुका लादणे चुकीचे होईल. हे टाळण्यासाठी अशा वेळी पर्याय म्हणून आम्ही शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देऊ शकतो. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नवाब मलीक यांनी दिली.
शिवसेना 50 – 50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम असून, जो पर्यंत या बाबत निर्णय होत नाही तो पर्यंत कोणतीही चर्चा नाही. या भूमिकेवर शिवसेना ठाम आहेत. त्यामुळे सत्तासंघर्षाचा पेच आणखीनच वाढला आहे. भाजपा हा मोठा पक्ष असला तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. शिवसेनेच्या भुमिकेमुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.