मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण झाला. शंभर दिवसांमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती एका पुस्तिकेव्दारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांच्या हस्ते आज विधानभवनात पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते आज विधानभवन येथे झाले. pic.twitter.com/EJmrNHXt5K
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 11, 2020
पुस्तिका प्रकाशन सोहळयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अन्ननागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक, सामाजिक न्याय मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन आज बुधवारी संपन्न झाले. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती या पुस्तिकेमध्ये उपलब्ध आहे.