नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर आज पाचव्यादिवशी परिस्थिती नियंत्रणात आहे. मृतकांचा आकडा ३४ च्या पुढे गेला आहे. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. हिंसा देशासाठी शर्मेची बाब आहे. सरकारने राजधर्माचे पालन केले पाहिजे. लोकांना संरक्षण दिले पाहिजे अशी मागणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
दिल्लीतील हिंसाचार पूर्वनियोजीत कट होता. भाजपच्या नेत्यांनी दंगल घडवली. या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असून, गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली होती. दिल्लीतल्या स्थितीवर काँग्रेस मुख्यालय ते राष्ट्रपती भवन असा मार्च काढून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज गुरुवार (२७ फेब्रुवारी) निवेदन सादर करण्यात आले आहे.
Congress delegation led by Congress President Smt. Sonia Gandhi & Former PM Dr. Manmohan Singh meet with the Honourable President of India, to present a memorandum on the Delhi violence. pic.twitter.com/jAzyh0fEvy
— Congress (@INCIndia) February 27, 2020
दिल्लीतल्या जनतेनं शांतता राखावी असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. गेल्या चार दिवसांपासून हिंसाचार सुरु असताना गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय करत होते. विरोधकांशी सत्ताधा-यांनी कोणतीही चर्चा केली नाही. पोलीस बंदोबस्त का वाढवला नाही. दंगल शांत करण्याचा कोणताही प्रयत्न का झाला नाही असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी उपस्थित केले आहे.
दिल्ली हिंसाचारात आतापर्यंत ३४ लोकांचा बळी गेला आहे. तर, २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दुकानांची, वाहनांची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. कायदा सुव्यस्था नियंत्रणात आणण्यासाठी, हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती भवनावर मार्च काढला होता. यावेळी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते.