Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेश‘या’ गाण्यामुळे भाजपने 'आप'वर ५०० कोटींचा ठोकला दावा

‘या’ गाण्यामुळे भाजपने ‘आप’वर ५०० कोटींचा ठोकला दावा

Arvind Kejriwal Manoj Tiwari,Arvind Kejriwal, Manoj Tiwari,Arvind, Kejriwal, Manoj, Tiwari,BJP,AAP,Lage Raho Kejriwal,LageRahoKejriwal,Lage Raho,Kejriwalदिल्ली : दिल्लीमध्ये थंडीमुळे हुडहुडी भरलेली आहे. परंतु विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम झालं आहे. आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. ‘आप’ने शनिवारी ट्विट केलेल्या एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यावरून भाजपने आम आदमी पार्टी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ५०० कोटींचा दावा ठोकला आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी ‘आप’वर या व्हिडिओवरून जोरदार टीका केली आहे. आपने ट्विट केलेल्या व्हिडिओ मनोज तिवारी आहेत. एका भोजपुरी अल्बममधील मूळ गाण्यात बदल करून ‘आप’ने ‘लगे रहो केजरीवाल’ हे आपचे प्रचारगीत व्हिडिओला लावले असल्याचे तिवारी यांनी आरोप केला आहे. भोजपुरीतील मूळ व्हिडिओत मनोज तिवारी थिरकताना दिसत आहेत.

आम आदमी पक्षाला त्यांच्या प्रचार गीतासाठी माझ्या व्हिडिओचा वापर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. तर, अब्रु नुकसान झाल्याप्रकरणी ५०० कोटी रुपयांचा दावा करण्यात आला असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments