Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? मलिकांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात भाजप २५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात ४०० ठिकाणी धरणे आंदोलन करणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं होतं. त्याबाबत राष्ट्रवादीन जोरदार प्रतिहल्ला केला. “तुम्ही २५ तारखेला मोर्चा काढाल, पण भाजपकडे कार्यकर्ते आहेत का? सगळे तर बिळात शिरले आहेत”, असा खोचक टोला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली. “चंद्रकांत पाटील यांना मी सांगू इच्छितो की, त्यांनी स्वत:चा इलाज करावा. त्यांनी चांगला डॉक्टर बघावा. त्यांना रोग झाला आहे”, असा घणाघात नवाब मलिक  यांनी केला. कमळाबाईंना शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली आणि संसार थाटला नाही. शिवसेनेनं सोडचिठ्ठी दिली म्हणून त्यांना त्रास होतोय. आता ते रडत बसले आहेत. त्यामुळे सर्वकाही सुरु आहे. मात्र, त्याचा काही एक उपयोग होणार नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी टीका केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments