अमरावती : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जास्त बोलायची सवय असल्याने त्यांच्या चुकीमुळे शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही. त्यांनी आता थोडा इगो बाजूला ठेवला पाहिजे. ते मुख्यमंत्री असतांना विरोधात असल्या सारखे बोलत होते. आता त्यांची चिडचिड वाढली आहे. असा टोला काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.
यशोमती ठाकूर या कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच अमरावतीमध्ये दाखल झाल्या. यावेळी त्यांचा जंगी स्वागत करण्यात आला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. आघाडीच्या सरकारमध्ये काही लिमिटेशन आहे. जी मंडळी नाराज आहे. त्यांनी ती नाराजी बाजूला सारली पाहिजे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या मतदारसंघात आम्ही काम करू, असे आज कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांच्या स्वागत समारंभाच्या वेळी सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये प्रत्येक स्तरावर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. हे आघाडीचे सरकार असल्याने काही लिमिटेशन आहे, त्यामुळे जी लोक नाराज आहे. ज्यांचे कार्यकर्ते नाराज आहे त्यांनी ती नाराजी बाजूला सारली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना केलं.