औरंगाबाद : कोरोनाने जगभरात थैमान घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे पाच रुग्ण असून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या एप्रिलमध्ये होणा-या मनपा निवडणूक सहा महिने पुढे ढकला अशी मागणी औरंगाबाद मनपाचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली आहे.
औरंगाबाद महापालिकेची एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे. मात्र, कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रॅली,सभांमध्ये नागरिक एकत्र येतील त्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी एमआयएम पाठोपाठ शिवसेनेनेही केली आहे.
हे ही वाचा: कोरोना : औरंगाबाद मनपा निवडणूक पुढे ढकला – खा. इम्तियाज जलील