औरंगाबाद : दारू पिऊन नववर्षाचं जल्लोष जीवघेना ठरला. औरंगाबादेत मध्यरात्री २ वाजता पाच तरूणांनी नववर्षाचं जल्लोष साजरा केला. त्यानंतर हे पाचही तरुन BMW कारने घरी परतत असताना दारूच्या नशेमुळे थेट कार विहिरीत पडली. यामध्ये दोन तरूण ठार तर तीन गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबादजवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्यासमोर घडली.
सौरभ नांदापूरकर (वय २९, रा.रा रोकडे हनुमान कॉलनी), विरभास कस्तुरे (वय- ३४, रा.पुंडलिक नगर) असे दोन्ही मृत मुलांची नावे आहेत. तर नितीन शिशीकर (वय- ३४), प्रतिक कापडीया (वय- ३०), मधूर जयस्वाल (वय- ३०) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. विहिरीत पडलेली कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली.
अपघातातमधील पाचही जण औरंगाबादमधील रोकडा हनुमान कॉलनीमधील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे. एमएच २० इएफ ०७०७ या क्रमांकाच्या BMWने पाचही जण मध्यपान करून निघाले होते. थर्टीफस्ट पार्टी करुन रात्री दोन वाजता पाचही जण BMW कारमधून निघाले होते. उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलताबाद किल्ल्याजवळ असलेल्या घाटावरून कार प्रचंड वेगाने येऊन थेट विहिरीत कोसळली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.