मुंबई : ‘नागरीकत्व सिद्धं करणं (NRC) हा कायदा केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल’ त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही. असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. उध्दव ठाकरेंच्या वक्तव्यावर टीका करताना भाजपाचे नेते व माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी वापरलेल्या शब्दांवर बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना आदराने बोलणेच योग्य व परंपरेला धरून आहे. त्यांच्या भूमिकेबद्दल विरोध असणे समजू शकतो परंतु त्याला विरोध करताना एकेरी भाषा वापरणे, बाप काढणे हे अयोग्य आहे. शेलार यांची भाषा पाहता ती भाजपच्या संस्कृतीचाच एक भाग असल्याचा टोला लगावून शेलार यांनी माफी मागितली पाहिजे, असे थोरात यांनी म्हटले आहे.