नागपूर हिवाळी अधिवेशन तीन दिवसांपासून गाजत आहेत. आज पुन्हा युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. कुठेही चिखल करा आणि कमळ फुलवा असं होऊ देणार नाही या शब्दात आदित्य ठाकरे यांनी पहिल्याच भाषणात भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणानंतर केलेल्या पहिल्याच भाषणात शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. सत्तेची हाव कशी असते आणि मित्रांना कसं डावललं जातं हे मी पाहिलं आहे. आमचे आवाज वेगवेगळे असले तरीही आमच्या सरकारमध्ये एकमत आहे एवढं नक्की. यापुढे कुठेही चिखल करुन कमळ फुलवा असले प्रकार होऊ देणार नाही” असंही त्यांनी म्हटलं आहे. याला भाजप काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.