नवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेल्या हिंसाचारात आत्तापर्यंत ९ जणांना मृत्यू झाला आहे. तर १३० जण जखमी झाले आहेत. जीटीबी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुनील कुमार यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली.
Delhi: Police and RAF are deployed in Khajuri Khaas, where violence and arson were reported yesterday. Section 144 has been imposed. pic.twitter.com/E25GgMILcv
— ANI (@ANI) February 25, 2020
सुनील कुमार म्हणाले, “आज चार मृतदेह रुग्णालयात दाखल झाले आहेत. काल पाच जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यामुळे आता मृतांची एकूण संख्या ९ वर पोहोचली आहे.” दरम्यान, काल हिंसाचार उसळलेल्या खजूरी खास भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून पोलीस आणि शीघ्रकृती दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
Sunil Kumar, Medical Superintendent of GTB Hospital, Delhi: Today four persons have been brought dead, yesterday five people lost their lives. Death toll rises to nine. #DelhiViolence pic.twitter.com/TTKJ0C1tkd
— ANI (@ANI) February 25, 2020
काल ईशान्य दिल्लीत उसळलेल्या या हिंसाचारामध्ये दिल्ली पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल रतन लाल हे शहीद झाले असून त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक उपस्थित होते.