विकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगनआहे. मोदी बोलायला लागले तर टिव्ही बंद करावा असे वाटते असे लोक बोलत आहेत. अशी खिल्ली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडवली. एलफिन्सटन्स चेंगराचेंगरी प्रकरणी गुरुवारी मोर्चाला ठाकरे यांनी संबोधीत केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, तत्कालीन गर्व्हेनर यांनी सांगितले अजून मंदी वाढणार असे उर्जीत पटेल यांनी सांगितले. याचा अर्थ नोकऱ्या जाणार. दोन चार लोक चालवणार सरकार. सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला. प्रभूंना काढल आणि गोयल यांना आणला. कोणासाठी आहे ही बुलेट ट्रेन. गुजरातचा मुंबईवरा डोळा आहे हे आम्हाला कळत नाही का? मूठभर गुजरातीसाठी बुलेट ट्रेन सुरु करणार का? नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री असतांना त्यांचा भाषण फिरत आहेत. मोदी म्हणाले होते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बुलेट ट्रेन सुरु करा सांगितले होते. त्यावेळी मनमोहनसिंगने विरोध केला.त्यावेळी मोदी म्हणाले होते हम दिखा तो सकते. एवढा खोटा बोलणारा पंतप्रधान मी कधी बघितला नाही. असा आरोप टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
विकास वेडा झालाय ही भाजपामधूनच आलेली स्लोगन… राज ठाकरे
RELATED ARTICLES