‘हेट स्टोरी 2’ फेम अॅक्ट्रेस सुरवीन चावला याचवर्षई जानेवारी महिन्यात लग्न केल्याचे सिक्रेट ओपन करुन चाहत्यांना धक्का दिला. २०१५ मध्येच सुरवीनने अक्षय ठक्कर या तिच्या प्रियकरासोबत लग्न केले होते. इटलीत दोघांचा विवाहसमारंभ पार पडला होता. लग्नाच्या जवळजवळ तीन वर्षांनी सुरवीनने ही गोष्ट उघड केली. लग्नानंतर पहिल्यांदाच सुरवीनने एका मुलाखतीत करिअर, लग्न आणि नव-याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
सुरवीन म्हणाली, लग्नानंतर फार काहीच बदलले नाही..
सुरवीन म्हणाली, “लग्नानंतर माझ्या आयुष्यात फार काही कमालीचे बदल झाले नाही आणि बदल झाले असले तरीही ते सकारात्मकच आहेत.
“माझ्या लग्नाचं समजल्यानंतर लोक ऐवढे शॉक्ड का आहेत?”, असा प्रश्नही तिला पडला आहे.
सुरवीन पुढे म्हणाली, “लग्न करण्यामुळे इतरांनी थक्क होण्याचं कारणच नाही. ते दिवस गेले जेव्हा अभिनेत्री त्यांच्या करिअरमधील काही ध्येय पूर्ण करुन त्यानंतरच लग्नाचा विचार करत असायच्या. आता तर लग्नानंतरही अनेक अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये पुढे जातात. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं, याचा अर्थ असा नाही की लग्न करण्याचा माझा विचारच नव्हता. लग्न आणि करिअर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हे लोकांनी ध्यानात ठेवलं पाहिजे”, असे सुरवीनने स्पष्ट केले.