Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनअमिताभ बच्चन यांच्या या गोष्टीमुळे दुखावले गेले धर्मेंद्र

अमिताभ बच्चन यांच्या या गोष्टीमुळे दुखावले गेले धर्मेंद्र

धर्मेंद्र यांचा आठ डिसेंबरला वाढदिवस असतो. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये आई मिलन की बेला, फूल और पत्थर, मेरा गांव मेरा देश, यादों की बारात, नौकर बिवी का, चुपके चुपके, शोले, सीता और गीता यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या आजवरच्या अनेक भूमिका प्रचंड गाजल्या आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकिर्दीत अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोले, दोस्त, चुपके चुपके, राम बलराम, सुरमा भोपाली. अंधा कानून यांसारखे धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्या जोडीचे अनेक चित्रपट गाजले आहेत. शोले या चित्रपटातील जय-वीरूची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

शोले या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची तर धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका साकारली होती. आज या चित्रपटाला इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. शोले या चित्रपटात धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्या दोघांच्याही भूमिका तितक्याच महत्त्वाच्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का, शोले या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना अगोदर साइन करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी शोले साइन केल्यानंतर जयच्या भूमिकेसाठी अमिताभ यांचे नाव सुचवले होते. अमिताभ यांच्या कारकिर्दीसाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरला. अमिताभ यांना हा चित्रपट धर्मेंद्र यांच्यामुळेच मिळाला. पण अमिताभ यांनी त्या काळात मीडियासमोर ही गोष्ट कधीच कबूल केली नाही याची धर्मेंद्र यांना खंत आहे. धर्मेंद्र यांनी एका मुलाखतीत याविषयी उल्लेख केलेला आहे. एका इव्हेंटमध्ये शोले या चित्रपटावरून धर्मेंद्र यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले होते. त्यावेळी धर्मेंद्र यांनी सांगितले होते की, अमिताभ यांना चित्रपटात घेण्यासाठी मीच शिफारस केली होती. पण त्यांनी ही गोष्ट त्या काळात कधीच मीडियासमोर सांगितली नाही. आता काही वर्षांपूर्वी त्यांनी ही गोष्ट मीडियासमोर कबूल केली. पण आज त्यांनी बॉलिवूडमध्ये त्यांचे इतक मोठे प्रस्थ निर्माण केले आहे की, लोकांना तेच महान वाटतात. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचे क्रेडिट कधी मिळालेच नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments