सोलापूर : पीएमसी बँक घोटाळ्यामुळें खातेदारांच्या मृत्यूची मालिका सुरुच आहे. आता पाचवा बळी गेला आहे. भारती सदारांगांनी यांचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
पीएमसी बँकेच्या आर्थिक घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृत महिला भारतीच्या मुलीचे आणि मेहुण्याचे सव्वा दोन कोटी रुपये बँकेत अडकले होते. पैसे अडकल्यामुळे भारती फार चितेंत होत्या. त्यामुळे ह्रदय विकाराच झटका आला.
पैसे बुडाल्याने माझ्या मुलीचा संसार उध्वस्त होणार आणि सर्वजण रस्त्यावर येणार, अशी भीती त्यांना वाटत होती. पीएमसी बँकेमुळे भारती यांचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे.