ठाणे : ठाणे शहराचा पाणीपुरवठा आज बुधवार सकाळी ९ वाजेपासून उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे ठाणेकरांचे हाल होणार आहे. उद्या पर्यंत पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहेत.
प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक ४ एप्रिल, सकाळी ९ ते गुरुवार दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत म्हणजे २४ तासांसाठी बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी ९वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ या परिसरात पाणी पुरवठा बंद राहील. बुधवारी रात्री ९ ते गुरुवार सकाळी ९ पर्यंत समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेवर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.