सिल्लोड : काँग्रेसचे माजी मंत्री अब्दुल सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश करुन औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातून उमेदवारी मिळवली. सिल्लोड हा मतदारसंघ भाजपचा होता परंतु सेनेला सोडल्यामुळे भाजपचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाजपच्या सर्व पदाधिका-यांनी राजीनामे दिले.
अब्दुल सत्तारांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार होते. परंतु स्थानिक भाजपच्या पदाधिका-यांनी विरोध केल्यामुळे सत्तारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीच ही खेळी खेळली होती. परंतु ती खेळी त्यांच्यावर उलटतांना दिसत आहे.
युतीच्या घोषणा झाल्यानंतर मतदारसंघावरून दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेला सोडू नये. अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र भाजपाने युतीमध्ये शिवसेनेला मतदारसंघ सोडल्यामुळे वाद उफाळला आहे. यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय सुकर होईल.