मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. आता राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक रुग्ण आढल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाचा वाढत्या संसर्ग लक्षात घेता शाळा, महाविद्यालयं, चित्रपट गृह बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यापाठोबात आता मुंबईमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असल्यानं मुंबईकरांना सावधानतेचा इशाराही देण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
- पुणे – 16
- नागपूर – 4
- यवतमाळ – 2
- ठाणे – 1
- अहमदनगर – 1
- कल्याण 1
- पनवेल – 1
- नवी मुंबई – 1
- मुंबई – 8
- नवी मुंबई- 1
- औरंगाबाद – 1
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.