मुंबई : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला. २९ फेब्रुवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कर्मचा-यांच्या मागणीला यश मिळाले आहे.
सरकारी कर्मचा-यांना दर शनिवारी,रविवारी सुट्टी राहणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ५ दिवसांचा आठवडा करण्याची मागणी कर्माचारी संघटनांकडून करण्यात आली होती. कर्मचारी संघटनांचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागवला होता. त्यानंतर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.