नवी दिल्ली – पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या व्यक्तीरिक्त शेकडो भारतीय पाकिस्तानच्या तरुंगात बंद आहेत त्यांच्यासंदर्भातही बोलले पाहिजे असे मत समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
कुलभूषण जाधव यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान पाकिस्तानकडून त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत भारतात संताप व्यक्त होत असतानाच नरेश अग्रवाल यांनी इतर भारतीयांबाबतही बोलले पाहिजे असे मत व्यक्त केले. ‘जर पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना दहशतवादी मानत असतील तर त्याच दृष्टीनं त्यांच्यासोबत व्यवहार करतील’, असे विधान नरेश अग्रवाल यांनी केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, ‘आपल्या देशातील दहशतवाद्यांसोबतही अशाच पद्धतीनं कठोर व्यवहार केला पाहिजे. पाकिस्तानच्या कारागृहांत शेकडो भारतीय नागरिक बंद आहेत, तर जाधव यांच्या व्यतिरिक्त त्यांच्यासंदर्भातही बोलणी व्हावी.