Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeदेशतरुणांनो मोदी - शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा हल्लोबोल

तरुणांनो मोदी – शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा हल्लोबोल

rahul gandhi narendra modi

नवी दिल्ली : डबघाईला आलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर, एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरून मोदी सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, रोजगाराच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार तुमच्या रागाचा सामना करू शकत नाही. मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या आठवड्यात पंतप्रधानाचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार असलेल्या डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली. त्यावरूनही विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दुसरीकडं सुधारित नागरिकत्व कायद्यावरून ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभरात विरोध होऊ लागला आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटले आहे.

अर्थव्यवस्था, सुधारित नागरिकत्व कायदा आणि तरुणांच्या आंदोलनावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून भाष्य केलं आहे. “मोदी आणि शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे. अर्थव्यवस्थेला पोहोचवलेली हानी आणि घटलेल्या रोजगारामुळे मोदी सरकार तरुणांच्या रागाला सामोरं जाऊ शकत नाही. त्यामुळे ते आपल्या प्रिय असलेल्या भारतामध्ये फूट पाडून द्वेष लपवत आहेत. आपण प्रत्येक भारतीयाविषयी प्रेम व्यक्त करून त्यांचा पराभव करू शकतो,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments