Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeदेशपंतप्रधान मोदींच्या शब्दाला अर्थ नाही, राहुल गांधीचा 'ट्विट'वार

पंतप्रधान मोदींच्या शब्दाला अर्थ नाही, राहुल गांधीचा ‘ट्विट’वार

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर खात्यावरुन गांधी यांनी नागा शांती करारावरुन पंतप्रधान मोदीं यांना लक्ष्य केले आहे.

२०१८ साल उजाडले तरी नागा शांतता करारात प्रगती नाही, त्यामुळे कराराचा ऐतिहासिक दावा करणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या बोलण्याला अर्थ नसल्याचे, गांधी यांनी म्हटले आहे.

मोदींच्या शब्दाला अर्थ नाही : 
ऑगस्ट २०१५ मध्ये नागा शांतता करारावर स्वाक्षरी करुन इतिहास रचल्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता. मात्र, २०१८ उजाडले तरी शांतता कराराची लवलेशही नसल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांच्या शब्दाला काही अर्थ नसतो, असा टोलाही गांधी यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान :
पंतप्रधान मोदी यांनी ३ ऑगस्ट २०१५ मध्ये नागा बंडखोरांसोबत सहमतीचा करार झाल्याचे घोषणा केली होती. तसेच हा करार म्हणजे पू्र्वोत्तर भारताच्या नवविकासाची सुरुवात असल्याचे म्हटले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments