नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा आज पूर्णपणे दिसून आला असून त्यांनी आपली सर्व निष्पक्षता गमावली अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी शरुर यांनी निवडणूक आयोगावर आज सडकून टीका केली.
भाजपने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करुनही त्यांना कसलीही नोटीस पाठवण्यात आली नाही, यावरुन आयोगाने याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप थरुर यांनी केला आहे. ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट असल्याचेही ते म्हणाले.