न्यायालयाच्या आदेशानुसारच ईडीने कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई करू. आम्ही सूडभावनेने कारवाई केली नाही. शरद पवारांविरुध्द सुडाने कारवाई केली नाही असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नवी मुंबईत अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त आज माथाडी कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आमच्यावर आरोप होत आहेत ते चुकीचे आहे. आम्ही कधीही सुडभावनेतून कारवाई करत नाहींत व करणार नाही. ईडी राज्यसरकारच्या कक्षेत येत नाही. ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच होत आहे.
जे दोषी आढळतील त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. जे दोषी नाही त्यांच्यावर कारवाईचा संबधच नाही. आमच्या सरकारवर आरोप लावणे चुकीचे आहेत. असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.