मुंबई : कोरोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. त्यामुळे संचारबंदी लागू केली पाहिजे अशी मागणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. संचारबंदी हा एकमेव उपाय असल्याचंही ते म्हणाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: अनेक ठिकाणी फिरुन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी लोक परिस्थिती गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव आला आहे.
@OfficeofUT तुमच्या कामाची प्रशंसा होते आहे पण काही जण गंभीर नाहीत खालचे फोटो बघा
संकट किती भयंकर आहे ह्याची कल्पना काही लोकांना नाही
लॉक डाउन ने भागेल असे वाटत नाही
संचार बंदी लागू करा pic.twitter.com/0sPQMlIRi4— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 23, 2020
राज्यात कोरोनाचे 89 रुग्ण झाले आहेत. 31 मार्चपर्यत लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद आहेत. कामाशिवाय लोक बाहेर गर्दी करत आहेत. त्याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चिॆता व्यक्त केली.