Wednesday, May 1, 2024
Homeक्रीडाभारत आणि ऑस्ट्रेलियाचा आज तिसरा ट्वेन्टी-२० सामना

भारत आणि ऑस्ट्रेलियाचा आज तिसरा ट्वेन्टी-२० सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिका एका रंजकदार वळणावर येऊन ठेपली आहे. जो संघ शुक्रवारी होणारा तिसरा सामना जिंकेल, त्याला मालिका विजय मिळवता येईल. त्यामुळेच हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे.

गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियापुढे भारतीय संघ धारातीर्थी पडल्याचे पाहायला मिळाले होते. भारताचे फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या जेसन बेहरेन्डॉर्फच्या भेदक वेगवान गोलंदाजीपुढे नतमस्तक झाले. त्यामुळे या सामन्यात जेसनच्या गोलंदाजीचा सामना भारतीय फलंदाज कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

गेल्या सामन्यात भारताच्या आघाडीच्या चारही फलंदाजांना जेसनमुळे झटपट तंबूचा रस्ता धरावा लागला होता आणि या धक्क्यातून त्यांना सावरता आले नव्हते. त्यामुळे या सामन्यात हे चार आघाडीचे फलंदाज कशी कामगिरी करतात, हे पाहावे लागेल. त्याचबरोबर केदार जाधव आणि हार्दिक पंडय़ा यांना स्थिरस्थावर झाल्यावरही मोठी खेळी साकारता येत नाही, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. महेंद्रसिंग धोनीकडून यष्टिरक्षण अव्वल दर्जाचे होत असले तरी या मालिकेत त्याला फलंदाजीत सूर सापडलेला दिसत नाही. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांच्याकडून सातत्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळत असली तरी त्यामध्ये अजून धार येणे अपेक्षित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments