मुंबई : दिल्ली हिंसाचार हा भाजपच्या नेत्यांनी घडवला. भाजपच्या नेत्यांनी प्रक्षोभक विधानं केली. “प्रक्षोभक विधानं करणाऱ्या भाजपच्या नेत्यांविरोधात अद्याप गुन्हा का नोंदवला नाही?” असा सवाल उपस्थित करणाऱ्या न्या. एस. मुरलीधर यांची मध्यरात्री बदली करण्यात आली आहे. या प्रकरणी क्रेंद्र सरकारवर सोशल मीडियाव्दारे जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान अभिनेत्री रिचा चड्डा हिने देखील एस. मुरलीधर यांच्या बदलीवरुन सरकारवर उपरोधिक टोला लगावला आहे.
रिचा चड्डा म्हणाली…
“नशीब ते जिवंत तरी आहेत.” अशा शब्दात रिचाने ट्विटरव्दारे आपला संताप व्यक्त केला. रिचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
At least he’s alive. https://t.co/FvkQDBueBl
— TheRichaChadha (@RichaChadha) February 27, 2020
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (CAA) वरून जे हिंसक आंदोलन सुरु आहे. त्याबाबत रिचा सातत्याने सोशल मीडियाव्दारे व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर रिचाने न्या. एस. मुरलीधर यांच्याबाबत केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होते आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.