नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ असून कुणीही घरातून बाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे.
जगभरात कोरोनाचा संकट वाढच चालला आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. संकल्प आणि संयम हेच कोरोनावर उपचार आहे. अत्यावाश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता टाळ्या,थाळ्या, घंटा नाद करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून केलं आहे.