औरंगाबाद: शिवसेना सर्व निवडणूका स्वबळावरच लढणार आहे. मी पूर्वीच जाहीर केले असून, भाजपासोबत अजिबात युती नाही. असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपाला पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १९ आणि २० मार्च असे दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की तयारीला लागा. कोणत्याही परिस्थिती भाजपाशी युती होणार नाही. शिवसेना स्वबळावर लढणार मी जाहीर केलेले आहे. यामुळे भाजपा सोबत युतीचा प्रश्नच नाही. तसेच औरंगाबादच्या कचरा कोंडी बद्दल त्यांनी औरंगाबाद करांशी माफी मागीतली. तसेच दहा दिवसात कचरा कोंडी सोडवतो असे आश्वासन औरंगाबाद करांना दिले. व अधिकाऱ्यांनाही झापले. तसेच महापौरांना कचराकोंडीचा प्रश्न लवकर सोडवण्याचे सूचना केल्यात.