
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी आरोप केला की, राज्य सरकारने लादलेले तीनभाषा धोरण हे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या कटाचा भाग आहे. जवळपास २० वर्षांनंतर आपले चुलत भाऊ उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र राजकीय मंचावर येत त्यांनी हा आरोप केला.
‘विजय’ मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मिश्कीलपणे म्हटले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि उद्धव यांना पुन्हा एकत्र आणले, जे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनाही जमले नाही.”
सुमारे दोन दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत ‘आवाज मराठिचा’ या विजय मेळाव्याचे आयोजन केले. राज्य सरकारने इयत्ता पहिलीतून हिंदी सक्तीचे तिसरे भाषाधोरण लागू करणारे दोन शासन निर्णय मागे घेतल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला.
“मराठी जनतेने दाखवलेल्या एकतेमुळे सरकारला तीनभाषा धोरणाचा निर्णय मागे घ्यावा लागला. हा निर्णय महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याच्या कटाचा प्रारंभ होता,” असे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हटले.

