
भारताच्या प्राचीन नगरी हस्तिनापूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या हस्तिनापूर साहित्य महोत्सवाने एक नवा सांस्कृतिक इतिहास घडवला आहे.
या भव्य सोहळ्यात प्रख्यात साहित्यिक आणि आंतरराष्ट्रीय हिंदीसेवी डॉ. यतींद्र कटारिया विद्यालंकार यांच्या “हस्तिनापूर: काल, आज आणि उद्या” या पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री व केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान तसेच पूज्य स्वामी कर्मवीर यांच्या हस्ते करण्यात आले.
हस्तिनापूरजवळील ऐतिहासिक बहसूमा रियासतीत आयोजित या महोत्सवात देश-विदेशातील साहित्यिक, विद्वान आणि विचारवंतांचा अभूतपूर्व मेळा जमला. महाभारतकालीन या भूमीवर साहित्य, संस्कृती आणि विचारांचा सजीव संगम अनुभवायला मिळाला.
आरिफ मोहम्मद खान यांनी हस्तिनापूर हे “आत्मबोध ते विश्वबोध”यांचा सेतू असल्याचे अधोरेखित करत या महोत्सवाला भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाची दिशा दिली.
डॉ. यतींद्र कटारिया यांना हिंदीच्या जागतिक प्रसारासाठी सन्मानित करण्यात आले तसेच त्यांची अखिल भारतीय साहित्य परिषद च्या राष्ट्रीय महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुंबईतील ख्यातनाम लेखिका व संपादक डॉ. वैदेही तामण यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.
महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित पत्रकार व लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. वैदेही तामण यांनी कार्यक्रमात प्रभावी भूमिका बजावली. त्यांच्या “सावरकर की क्रांतिकारी यात्रा” या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले, ज्यामुळे साहित्यविश्वात विशेष उत्सुकता निर्माण झाली.
यावेळी डॉ. वैदेही तामण म्हणाल्या, “लोकांमध्ये पुस्तकांविषयी रस निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. रील्सच्या युगात लोक वास्तवापासून दूर जात आहेत. भारत ही साहित्याची भूमी आहे आणि हेच या मातीतले आत्मतत्त्व आहे.”
“आत्मबोध ते विश्वबोध” या विषयावर आधारित व्याख्यानमालेत आत्मचिंतन आणि वैश्विक जाणिवांचा सखोल विचार मांडण्यात आला.
अखिल भारतीय कवी संमेलन आणि विविध चर्चासत्रांनी महोत्सवाला अधिक समृद्ध केले. या निमित्ताने हस्तिनापूरमध्ये दरवर्षी साहित्य महोत्सव आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला, तसेच अमरोहा येथेही अशाच भव्य आयोजनाची घोषणा करण्यात आली.
एकूणच, हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम नसून भारताच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनाचा मजबूत पाया ठरला आहे.

